प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उद्गार
माझे खरे मोठेपण मी मारलेल्या चाळीस लढायांत नसून तयार केलेल्या कायदासंहितेत आहे.
- नेपोलियन
रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती.
- नेपोलियन
तुम्हांस जर एक वर्षाची बेगमी करावयची असेल तर धान्य पेरा ; शंभर वर्षाची बेगमी करावयची असेल तर माणसे पेरा.
- कर्मवीर भाऊराव पाटील
करा किंवा मरा.( Do or Die.)
- महात्मा गांधी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच !
-- लोकमान्य टिळक
लोकसंख्यावाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे.
- र.धों.कर्वे
जय जवान , जय किसान .
- लालबहादूर शास्त्री
सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर .
- महात्मा गांधी
लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या.
-वि .दा.सावरकर
"तुम मुझे खून डो ,मै तुम्हे आझादी दूँगा"
- नेताजी सुभाषचंद्र बोस
माझ्या रक्ताचा एक थेंब देशाचे स्वातंत्र्य आणि एकता यांचे रक्षण करील.
- इंदिरा गांधी
हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे,तितकीच ती अस्पृश्यांची आहे.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही.
-- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
वेदांकडे परत चला.
- स्वामी दयानंद सरस्वती
घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतः अनुपालन झाले तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल.
- न्या.एम.सी.छगला
अस्पृश्यता पळणे हा परमेश्वराविरुद्ध व मानवतेविरुद्ध केलेला गुन्हा आहे.
- महात्मा गांधी
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!
- लोकमान्य टिळक
पन्नास वर्षे ! ब्रिटीश राज्य तोवर टिकेल तर ना ?
स्वा.सावरकर
चलो दिल्ली !
-- सुभाषचंद्र बोस
चळवळ करा ; चळवळ करा , अखंड चळवळ करा .
- दादाभाई नौरोजी
ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा.
- मंगल पांडे
मी इंग्रज सत्ता मानीत नसल्याने मी बंद केले असे म्हणताच येत नाही.
-- तात्या टोपे
असे महापुरुष मारत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात.
महात्मा गांधींनी टिळकांबद्दल असे उद्गार काढले
लोकमान्य टिळकांइतकीच शिक्षा मिळण्याचा मान मिळाला हा मी माझा बहुमान समजतो.
-- महात्मा गांधी
मी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकले ..
-- महात्मा गांधी
भारत मुक्त झाला की मानवता मुक्त झालीच.
-- नेताजी सुभाषचंद्र बोस
भारतातील उच्चवर्णीय भौतिक आणि नैतिकदृष्ट्या मृत असून आपल्याला फक्त बहुजन समाजाकडून अपेक्षा आहेत.
- स्वामी विवेकानंद
जिच्या हाती पाळण्याची दोरी , ती जगाते उद्धरी..
- महात्मा फुले
विद्येविना मती गेली ,मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले
- ( शेतकऱ्याचा आसूड )
सर्वसाक्ष जगत्पती , त्याला नाकोच मध्यस्थी .
- सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य
शिका,संघटीत व्हा , संघर्ष करा.
- डॉ.बाबसाहेब आंबेडकर
जर माझ्या मनात द्वेष असता आणि सुडाची भावना असती तर पाच वर्षाच्या आत मी देशाचे वाटोळे केले असते .
--डॉ.बाबासाहेब आंबेडकर
देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.
-- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
इष्ट असेल ते बोलणार , साध्य असेल ते करणार .
- गो,ग.आगरकर
भित्रे लोक त्यांच्या मरणापूर्वीच अनेक वेळा मारतात.
--शेक्सपिअर
देश आपल्यासाठी काय करील हे विचारू नका , तुम्ही देशासाठी काय करणार ते आधी सांगा.
-जॉन एफ केनेडी
जय जवान , जय किसान , जय विज्ञान !
- अटलबिहारी वाजपेयी